भय कैचें दास म्हणे

रामदासांची हनुमानगाथा

हनुमानास नुसते वेशीवर न ठेवता मराठी जनमानसात स्थापण्याचे काम केले ते समर्थांनी(रामदास). मारुतीस्तोत्र, मारुतीची आरती(इतर अनेक देवतांच्या लोकप्रिय आरत्या समर्थांनी रचल्या) अनेक शतके महाराष्ट्रात घरोघरी मुखोद्गत आहेत.समर्थांच्या अफाट वाङ्मयात हनुमानाचे वर्णन अनेक ठिकाणी आढळते. ते एका संकेतस्थळावर असावेत ही इच्छा.

जय जय रघुवीर समर्थ!

पडतो संकष्ट जीवा जडभारी | 
स्मरावा अंतरीं बलभीम ||१||

बलभीम माझा सखा सहोदर |
निवारी दुस्तर तापत्रय ||२||

तापत्रय बाधा बाधूं न शके कांहीं |
मारुतीचे पायीं चित्त ठेवा ||३||

ठेवा संचिताचा मज उघडला |
कैवारी जोडला हनुमंत ||४||

हनुमंत माझे अंगीचें कवच |
मग भय कैचें दास म्हणे‌ ||५||

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.