रामदासांची हनुमानगाथा
हनुमानास नुसते वेशीवर न ठेवता मराठी जनमानसात स्थापण्याचे काम केले ते समर्थांनी(रामदास). मारुतीस्तोत्र, मारुतीची आरती(इतर अनेक देवतांच्या लोकप्रिय आरत्या समर्थांनी रचल्या) अनेक शतके महाराष्ट्रात घरोघरी मुखोद्गत आहेत.समर्थांच्या अफाट वाङ्मयात हनुमानाचे वर्णन अनेक ठिकाणी आढळते. ते एका संकेतस्थळावर असावेत ही इच्छा.
जय जय रघुवीर समर्थ!
कष्टी जाला जीव केली आठवण |
पावलें किरण मारुतीचें ||१||
संसारसागरीं आकांत वाटला |
भुभु:कर केला मारुतींने ||२||
उडी घाली मज अनाथाकारणें |
तेणें माझें केलें समाधान ||४||
उल्हासलें मन देखोनि स्वरूप |
दास नव्हें रूप राघवाचें ||५||